पुढील कविता वाच व त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडव.
माउलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार ,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार
तुकोबाच्या अभंगाला
मंद चिपळ्याची साथ ,
भरारतो रानवारा
तसा झाडाझुडुपात
पिऊनिया रानवारा खोंड नावे वारेमाप ,
येता मातीचा सुगंध
स्तब्ध झाले आपोआप
अवखळ बाळापरी
पक्षी खेळतो मातीत,
उभारलेल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत
धारा वर्षतां वरून
बैल वशिंड हालवी ,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी
पुढील प्रश्न वाच व योग्य पर्याय निवडा...
(१) खोंड सैरावैरा का धावत होता ?
१) मातीचा सुगंध आल्यामुळे
२) रानवारा अंगाला लागल्याने
३) टपोरे थेंब अंगावर पडल्यामुळे
४) कळपातून चुकल्यामुळे
(२) कवितेतील वर्णनानुसार ' भुकेलेले तान्हे बाळ ' कोणाला म्हटले आहे ?
१) शिवार
२) पक्षी
३) खोंड
४) वासरू
(३) कवितेतील वर्णन कोणत्या ऋतूमधील आहे ?
१) शरद
२) हेमंत
३) शिशिर
४) वर्षा
0 Comments